ऑनलाईन टीम / दिल्ली :
आपल्या भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काश्मिरी कविता केवळ ऐकवलीच नाही. तर, हिंदीमध्ये तिचा अर्थ सांगितला. हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसे… हमारा वतन दल झील में खिलते हुए कमल जैसे… नौजवानों के गर्म खून जैसा… मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन… असं सांगत अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली. भारत हा सर्वांचा आहे, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच कृषी क्षेत्राला उभारी देण्याबाबतच्या घोषणा करण्याआधी त्यांनी एक तामीळ म्हण सुद्धा ऐकवली. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या घोषणेचा पुनरुच्चार करताना अर्थव्यवस्थेच्या सर्व आघाडय़ांवर सुधारणा घडवून आणण्याचं सरकारचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले हा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.