गुरुवारीही म. ए. समितीकडे अर्ज दाखल : आतापर्यंत 550 हून अधिक हरकती नोंद
प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोड विरोधात हरकती दाखल करण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस असून शेतकऱयांनी तातडीने हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी 4.30 पर्यंत हरकती दाखल करण्यासाठी वेळ आहे. तेव्हा ज्या शेतकऱयांनी आपल्या हरकती दाखल केल्या नाहीत, त्यांनी तातडीने दाखल कराव्यात. गुरुवारीही म. ए. समितीकडे काही शेतकऱयांनी हरकती दिल्या आहेत. आता त्या शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडे दाखल केल्या जाणार आहेत.
सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. त्याबाबत प्रांताधिकाऱयांनी वृत्तपत्रातून नोटिफिकेशन जारी केले होते. तालुक्मयातील 31 गावांमधील जमीन रिंगरोडमध्ये जात आहे. त्याविरोधात शेतकऱयांनी आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. आतापर्यंत 550 हून अधिक जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. गुरुवारीही तालुका म. ए. समितीकडे अनेक शेतकऱयांनी हरकती दाखल केल्या आहेत.