सरकार निद्रीस्त. आणखीन किती बळी जाण्याची वाट पाहणार ? धबधब्याच्या पात्रत उतरणे बंद करण्याची मागणी.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी मतदारसंघातील हरवळे तिर्थक्षेत्रावरील धबधब्याच्या पात्रात या महिन्यातील दुसरा बळी गेला. दिल्लीतील एक महाविद्यालयीन विद्यार्थी आंघोळीसाठी उतरला असता बुडाला. तर त्याचा भाऊ सुखरूप वर आला. याच महिन्यात गेल्या 1 रोजी या धबधब्याच्या पात्रात पंजाब येथील एक 20 वषीय युवक बुडाला होता. या नियमित घटनांमुळे सध्या लोकांकडून सरकारच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले जात आहे. आणखीन किती तरी बळी जाण्याची प्रतिक्षा सरकार करीत आहे ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
उपलब्ध माहितीनुसार मयत युवकाचे नाव हर्ष राजेश कुमार (21) असे असून तो दिल्ली येथील महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो आपल्या अन्य तीन साथीदारांसह हरवळे येथे पर्यटनासाठी आला असता धबधब्याच्या पात्रातील पाणी पाहून त्यांना भूरळ पडली. लगेच त्यांनी आंघोळ आणि मौजमजा करण्याचा बेत आखला आणि पाण्यात उतरण्याची तयारीही केली. यावेळी त्यांना स्थानिकांनी उतरण्यास मज्जाव केला होता. मात्र त्यांनी स्थानिकांचे न ऐकता ते पाण्यात उतरले. काठावर बसून पाण्याशी खेळ करत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. आणि चारपैकी हर्ष राजेश कुमार हा पाण्यात बुडाला. त्याच्य बरोबर त्याचा भाऊही उतरला असता तो सुदैवाने वाचला.
या घटनेची माहिती डिचोली पोलीस व डिचोली अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली हरवळे येथे दाखल झाले. दलाच्या आदित्य गावस, पिल्लय व हर्षद सावंत यां?नी पाण्यात उतरून मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर घटना संध्याकाळी 6.20 वा. घडली होती. डिचोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. पोलीस उपनिरीक्षक करिष्मा परूळेकर यांनी पंचनामा केला व त्याच पुढील तपास करीत आहे.
हरवळे धबधब्याचे पात्र बनले आहे धोकादायक
हरवळे गावातील प्रसिध्द धबधबा आणि देव रूदेश्वर यामुळे या भागाला मोठे वैभव लाभले आहे. या ठिकाणी तिर्थक्षेत्रावर मोठय़ा संख्येने लोक पिंडदान व इतर विधीसाठी येतात. मात्र आज हे स्थान नियमितपणे होणाऱया बुडून मृत्यूमुळे भलतेच प्रसिध्द झाले आहे. या धबधब्याचे पात्रच इतके मोहक आहे की, पाणी पाहिल्यावर कोणालाही त्याची भूरळ पडतेच आणि कोणीही तेथे आंघोळीसाठी उतरतात. मात्र धबधबा जोरदारपणे कोसळणाऱया या पात्राच्या खोलीचा अंदाज उतरणाऱयां?ना येत नसल्याने अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतच आहेत. त्यामुळे या धबधब्याचे पात्र सध्या धोकादायकच बनले आहे.
सरकारकडून उपाययोजनांची अपेक्षा, मात्र निराशाच.
या धबधब्याच्या पात्रात होणाऱया अशा नियमित घटनांमुळे सरकारकडून काहीतरी ठोस उपाययोजना हाती घेण्याची अपेक्षा सर्वांनाच आहे. मात्र अशा घटना घडतच असल्याने लोकां?कडून नाराजीच व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी या भागात अशाच घटना घडल्यानंतर तत्कालीन सभापती व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांनी धबधब्याच्या काठावर जिवरक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ते कुठे गायब झाले, हे कोणालाही कळले नाही. आता पुन्हा या धबधब्यावरील मृत्यू होण्याच्या घटना वाढू लागल्याने सरकारने आतातरी ठोस पावले उचलावी अशी मागणी होत आहे.