अजय कांडर/ कणकवली
विठ्ठल आणि संत परंपरेचं नातं अजोड आहे. खरं तर ते एक महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. संतांनी विठ्ठलाला उद्देशून लिहिलेल्या अभंगातून समाज प्रबोधन केले गेले, समाजाला डोळस दृष्टी दिली. आज पुन्हा अशाच डोळस दृष्टीची गरज असल्याने राष्ट्र सेवादलातर्फे आषाढीवारीनिमित्त सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच्या विविध भागातील मान्यवरांच्या सहभागाने संतांचे अभंग आणि त्यांचे निरुपण पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘एक तरी अभंग आठवावा…हरहर विठ्ठल घरघर विठ्ठल’ अशी कॅचलाईन देऊन राबविलेल्या या उपक्रमात अनेक मान्यवरांनी संत रचना सादर करत तिचे महत्वही पटवून दिले. त्याची व्हीडिओ मालिका आषाढी एकादशीला राज्यभर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचविण्यात आली.
कोकणचे सुपुत्र तथा ज्ये÷ सामाजिक कार्यकर्ते-राष्ट्र सेवादलाचे मुंबई अध्यक्ष शरद कदम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. यात महानंदा डेअरी, मुंबईचे माजी व्यवस्थापक लहू गोपाळे, लेखक अशोक लोटणकर, शामसुंदर सोन्नर महाराज, प्रा. उत्कर्षा लाड, मिलिंद बने, गुंतवणूक सल्लागार डॉ. मानसी कदम, डॉ. प्रा. मंगल कदम, प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे, प्रणिता वारे, सिरत सातपुते, शमा सय्यद, राजश्री कदम, वंदना मते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यात समावेश आहे.
मालिका सोशल मीडियावर प्रसारित
दु:खाचे मूळच सुखाचा अतिशोध घेण्यात आहे हा विचार आजवर संतांनी दिला. संत म्हणजे सगळी मनातील इच्छा-आकांक्षा दूर सारून महात्मा पदापर्यंत पोहोचलेली व्यक्ती. अशा व्यक्तीचे अतीसुख हे दु:खाचे कारण होऊ शकत नाही. त्यामुळेच संत विचार सर्वत्र झाला आणि त्याचे प्रत्यक्षात आचरण ज्यांनी-ज्यांनी केले, ते आपले दु:ख विसरून सुखाच्या मार्गाने चालू लागले. संतांनी आपल्या अभंग लेखनातून हाच विचार दिल्याने आषाढीनिमित्त हा ‘एक तरी अभंग आठवावा…हरहर विठ्ठल-घरघर विठ्ठल’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वरील सर्व मान्यवरांनी वेगवेगळय़ा संतांचा एक-एक अभंग सादर करून त्या अभंगाचे मथितार्थ कथन केला. त्याची एक व्हीडिओ मालिका बनवून राष्ट्र सेवादलातर्फे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली.
वारी : महाराष्ट्राचा आध्यात्मिक सोहळा
वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. लाखो लोक या सोहळय़ात स्वतः होऊन सामील होतात. कुठल्याही लाभाच्या अपेक्षेने नव्हे, तर एका निर्मळ आणि डोळस भावनेने भक्ती परंपरेशी नाते जोडण्यासाठी, या नम्र भूमिकेतून देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणाऱया दिंडी सोहळय़ात गेली काही वर्षे राष्ट्र सेवादल, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, वारकरी सेवा प्रति÷ान, संविधान प्रचारक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्रभारती, अनुभव शिक्षा केंद्र, लेक लाडकी अभियान, समता प्रति÷ान, येवला, जिज्ञासा अकादमी आदांच्या माध्यमातून नाटक, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, विविध क्षेत्रातील कलाकार, पत्रकार सहभागी होत असतात. यावषी मात्र कोरोना संकटामुळे आपण या आनंदाला मुकलो आहोत, अशी भावनाही मनाशी असल्यानेही हा उपक्रम राबविण्यात आला आहे.