पुणे / प्रतिनिधी :
अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर व दमन या किनारपट्टीदरम्यान बुधवारी दुपारपर्यंत धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला.
सद्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असून, मंगळवारपर्यंत त्याचे वादळात रूपांतर होईल. ३ जूनला हे वादळ हरिहरेश्वरला धडकण्याचा अंदाज आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असून एनडीआरएफच्या ३ तुकड्या मुंबई, २ पालघर, १ ठाणे , १ रायगड, १ रत्नागिरी १ सिंधुदुर्ग येथे तैनात करण्यात आल्या आहेत.