न्यायालयाने मागणी फेटाळली, शेतकऱयांना मिळाला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याची स्थगिती उठवावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळला असून स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे स्थगिती कायम राहिली आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्यावरील स्थगिती उठवावी, यासाठी पहिले अतिरिक्त उच्च दिवाणी न्यायालयाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी अर्ज केला होता. न्यायालयाने काही शेतकऱयांना नोटिसा पाठविल्या होत्या, समन्सही बजावले होते. त्यामुळे त्यांच्यावतीने ऍड. रविकुमार गोकाककर यांनी न्यायालयासमोर अर्ज पुन्हा दाखल केला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलाचा अर्ज न्यायालयाने ग्राहय़ धरला नाही.
हलगा-मच्छे बायपाससाठी राष्ट्रीय महामार्गाकडून पुन्हा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोही अपयशी ठरला आहे. आता स्थगिती कायम आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अडचणीत आले आहे. शेतकऱयांनी एकजुटीने लढा दिला आहे. आता आपली बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांनी व्यक्त केल्या आहेत.