प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे एपीएमसीचे मुख्य भाजीमार्केट बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱयांनी हलगा-अलारवाड रोडवर तात्पुरत्या भाजीमार्केटमध्ये एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. त्याचबरोबर रस्त्यावरच वाहनांची पार्किंग झाल्यामुळे वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती. यामुळे ये-जा करणाऱया वाहनांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
एपीएमसीचे मुख्य मार्केट काही दिवस बंद करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने शहराबाहेर भाजीमार्केट यापूर्वीच सुरू केले होते. हलगा रोडवर, ऑटोनगर येथील आरटीओच्या मैदान तसेच हिंडाल्कोजवळ असलेल्या खुल्या जागेत तात्पुरते भाजीमार्केट सुरू करण्यात आले होते. मात्र पुन्हा मुख्य भाजीमार्केटच सुरू झाल्यामुळे ते बंद करण्यात आले. मात्र शेतकरी, व्यापाऱयांनी, खरेदी आणि विक्रीदारांनी हलगा-अलारवाड रोडवरच भाजी विक्री आणि खरेदी करण्यास सुरुवात केली.
अचानकपणे या ठिकाणी हे भाजीमार्केट सुरू करण्यात आले. भाजी घेणाऱयांची तसेच विकणाऱयांची आणि शेतकऱयांची गर्दी उसळल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सोशल डिस्टन्सचा फज्जाही उडाला होता. यामुळे काही जणांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.