ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे C-17 विमान काबूलसाठी सज्ज झाले आहे. काबुल विमानतळावर पुरेसे भारतीय नागरिक पोहोचताच हवाई दलाचे विमान काबूलला रवाना होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे C-17 विमान 250 भारतीयांना घेऊन मायदेशी परतेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र, किती भारतीय लोक काबुल विमानतळावर पोहोचण्यास सक्षम आहेत, त्यावर हे अवलंबून आहे. कारण काबुल विमानतळावर अमेरिकन सैनिक तैनात असले तरीही काबूल शहर तालिबानने ताब्यात घेतले आहे आणि त्याचे दहशतवादी प्रत्येक चौकी आणि नाक्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, अफगाणिस्तानात 400 हून अधिक लोक अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.