प्रतिनिधी/ सातारा
राजवाडा येथील अजिंक्य गणेश मंदिरासमोर चुकीच्या पद्धतीने लागलेले फळगाडे हटवण्यात यावेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे करताच शंभूराज देसाई यांनी शाहुपूरी पोलिसांना कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. शाहुपूरी पोलिसांनी कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले.
अजिंक्यगणेश मंदिरासमोर कशाही पद्धतीने फळगाडे लावले जातात. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी त्रास होत असतो. त्याच अनुषंगाने तेथील अनाधिकृत लागलेले फळगाडे हटवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी केली होती. त्यानुसार वाहतूक शाखेकडून वारंवार सुचना दिल्या जात आहेत. तरीही फळगाडे लागत असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानंतर त्यांनी शाहुपूरी पोलिसांना कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरुन अजिंक्य गणेश मंदिराच्या समोर लागणारे हातगाडे आता काढले जाणार आहेत.