समता सैनिक दलचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाले. ही घटना अत्यंत गंभीर आहे. अशाप्रकारे देशामध्ये घटना घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 1978 च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समता सैनिक दल यांच्यावतीने करण्यात आली.
हाथरसमध्ये घडलेली घटना गंभीर आहे. अशाप्रकारे महिलांवर अन्याय होत असतील तर महिलांनी जीवन कसे जगायचे? असा प्रश्नदेखील करण्यात आला आहे. त्या तरुणीच्या कुटुंबीयांवरही दबाव घालण्यात आला होता. अशाप्रकारे दबाव घालणे योग्य आहे का? जर असा दबाव होत असेल तर महिलांनी जगायचे कसे? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.
अनुसूचित जाती-जमातीसाठी जी राखीवता आहे ती राखीवता घटनेनुसार मिळाली पाहिजे. 1978 मध्ये जो कायदा झाला आहे तो लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष परशराम शिंदे, श्रवण कांबळे, दिलशाद ताशिलदार, हणमंत अगसीमनी, दिवानसाब देसाई, महम्मद सुभेदार, तौफिक देसाई, मुजम्मील मारिहाळ, रियाज मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..