मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांची टीका
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरातून गडनदी ते जानवलीपर्यंत बांधलेल्या हायवेच्या फ्लाय ओव्हरब्रिजचे काम व रस्ते, गटारांची झालेली दुर्दशा ही केवळ एकमेकांवर चिखलफेक करणाऱया भाजप व शिवसेनेच्या कर्माचे फळ आहे, अशी टीका मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केली आहे.
दाभोलकर म्हणतात, नेते व जनतेच्या मागणीनुसार शासनाने जानवली- कणकवली व वागदे येथील हायवे 60 मीटरऐवजी 45 मीटर रुंदीचा केला. त्याप्रमाणे (आरो लाईन) रेड फुलीचे शिक्के मारून हद्द निश्चित करण्यात आली. मात्र, सर्व्हिस रोड व दोन्ही बाजूंनी गटारांच्या फूटपाथवर उर्वरित जागेचे मालक आपणच असल्यासारखे अनेकांनी अतिक्रमण केले आहे. घरे, बांधकामे यांच्या मोबदल्याबाबत लक्ष केंद्रीत करण्यात आले. मात्र, यात रस्त्याच्या कामांवर दुर्लक्ष झाले. पहिल्या पावसातच कणकवलीत चिखलाचे साम्राज्य झाले. आमदारांनी अधिकाऱयांवर चिखलफेक केली. पण गेले वर्षभर चिखलफेक करणारे व विरोधकही मूग गिळून गप्पच होते. फक्त अधूनमधून कणकवलीकर नावाचे अभ्यासू पुढारी सरकार दरबारी भेट देऊन गाऱहाणे मांडत होते. या साऱयात हायवेच्या कामांची निसर्गानेच पोलखोल केली.
कणकवली, कसाल, ओरोस, कुडाळ आदी ज्या-ज्या ठिकाणी मातीचे मोठे भराव घालून ब्रीज बांधण्यात आले आहेत, त्या-त्या ठिकाणी मातीवर दगड टाकून पिचिंग करण्यात आलेले नाही. या कामाचे केंद्र सरकारकडून स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवे. महाड पूल दुर्घटनेनंतर कोकणातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, त्याप्रमाणे हायवेच्या नव्याने बांधलेल्या सर्व पुलांचे व रस्त्याचेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हायवे प्राधिकरणाने दोन्ही बाजूने केलेल्या सीमांकनाच्या खुणा पुसल्या गेल्या. काही इमारत मालकांनी बाधीत जागेची पूर्ण नुकसान भरपाई मिळूनही त्यांनी अर्धवट पाडलेली बांधकामे दुरुस्ती करून तेथे आपले व्यवसाय सुरू केले आहेत. या इमारती पाडताना त्यांचे पिलर हलले आहेत. अशी एखादी इमारत ऐन पावसात कोसळल्यास मनुष्यहानी होण्याची दाट शक्मयता आहे. याकडे सर्वांनी डोळेझाक केली आहे. आम्ही कणकवलीकर मंडळी ही बांधकामे काढून टाकण्याची मागणी का करीत नाहीत? असा सवाल दाभोलकर यांनी केला.
आता तर हायवेच्या दुतर्फा व पुलाखाली फेरीवाले, किरकोळ विपेते, भाजीवाले, गाडीवाले या सगळय़ांनी हायवेच्या फूटपाथपर्यंत अतिक्रमण केले आहे. खासदार, आमदार व सत्ताधारी पक्षाचे नेते अनेकवेळा रस्त्याच्या दुर्दशेची पाहणी करताना संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱयांना फुसका दम देतात. मात्र, याबाबत त्यांनी लोकसभा, विधानसभेत एकदाही आवाज उठविलेला नाही, अशी टीका दाभोलकर यांनी केली आहे.