प्रतिनिधी / बेळगाव
उपजिवीकेसाठी शेतात पिकविलेले गलाटा फुलाचे पीक लॉकडाऊनमध्ये खराब झाल्याने नैराश्येतून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हालगा गावात काल सोमवारी रात्री साडे दहा वाजता घडली. मारूती भिमा बिळगुचे (वय 63) रा. हालगा असे मयत शेतकऱयाचे नाव आहे. त्याने शेतवाडीतील घरासमोर आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.