ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्रातील वर्धामधील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, वर्धा या जिह्यात महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश दिला आहे. अशा जिह्यात महिलांवर अशी वेळ येत असेल तर खूप दुःखदायक आहे. अशा घटना रोखल्या पाहिजेत. अन्यथा महिला, मुली घराच्याबाहेर पडणार नाही.
महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणांवर कडक कारवाई करण्याची आणि कडक कायदा आणण्याची गरज आहे. अन्यथा आमच्यासारख्या महिलाही यातून सुटणार नाही, अशी गंभीर बाब खासदार राणा यांनी लोकसभा सभागृहात उपस्थित केली.