प्रतिनिधी /बेळगाव
‘विजेचा अपव्यय टाळा’ असा संदेश देण्यात येतो. तर दुसरीकडे दिवसाढवळय़ा पथदीप सुरू असल्याचे पहावयास मिळते. येथील यमनापूर सर्व्हिस रोडवरील हिंडाल्को फॅक्टरीसमोर दिवसाही पथदीप सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पावसाचे दिवस सुरू झाले की वाऱयामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. तसेच रविवारी सुटीदिवशीही अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. मात्र दिवसाढवळय़ा सुरू असलेले पथदीप बंद करण्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.