मुंबई/प्रतिनिधी
भाजपा आमदार नितशे राणे यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली जावी, या मागणीसाठी काल भाजपाकडून मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांवर आंदोलन करण्यात आलं. यावरून आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाण साधत “सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?” असा सवाल केला आहे. तसेच हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.काल झालेल्या भाजपच्या आंदोलनानंतर दोन दिवसांत लोकल संदर्भात निर्णय होईल असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती.
दरम्यान दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली जावी, या मागणीसाठी काल भाजपाकडून मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांवर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर लोकल सर्वासाठी लोकलबाबत दोन दिवसांत लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय होईल मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हंटले होते. यांनतर भाजप आमदार नितशे राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे. नितशे राणेंनी “सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.
“दोन दिवसात लोकल चालू ..१७ ऑगस्ट पासून शाळा चालू ..मग दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटकरत महाविकासआघाडी सरकावर टीका केली आहे.