84 विद्यार्थ्यांचा समावेश : काश्मीरच्या गुरेझ खोऱयात मोठे बचावकार्य, लष्कराचीही मदत
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे बर्फवृष्टीमुळे गुरेझ खोऱयात अडकलेल्या 230 प्रवाशांना भारतीय लष्कराने रविवारी विमानातून ‘एअरलिफ्ट’ करत बाहेर काढले. लष्कराच्या विशेष पथकाने स्थानिकांच्या मदतीने काही तासांच्या मोहिमेनंतर सर्वांची सुटका केली. या कारवाईत एमआय-17 आणि आर्यन खासगी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. सर्व 230 लोकांना 17 फ्लाईट्समधून एअरलिफ्ट करण्यात आले. बर्फात अडकलेल्यांमध्ये 84 जेकेएसएसबीचे स्पर्धक, 103 ज्ये÷ नागरिक, 13 मुले समाविष्ट होती. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा या संपूर्ण बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी सर्व प्रवाशांना, विशेषतः जेकेएसएसबी परीक्षेला जाणाऱया विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बर्फातून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सध्या काश्मीरच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीनंतर रस्ता बंद झाल्यामुळे दोनशेहून अधिक लोक गुरेझ खोऱयातील विविध भागात अडकले होते. गुरेझ खोऱयातील दावर, कांजलवान, नीरू आणि बदुआब भागात 114 लोक उपस्थित होते. या सर्वांना बांदिपोरा येथे विमानाने नेण्यात आले. त्याच वेळी, 103 ज्ये÷ नागरिक आणि 13 मुलांना इतर भागातून विमानाने हलवण्यात आल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.
बर्फाच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास विलंब झाल्यास त्यांना परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळता येणार नसल्याचे निर्देश लेफ्टनंट गव्हर्नरनी दिल्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढले. बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणे ही मोठी गोष्ट आहे. लष्कराने विद्यार्थ्यांना एअरलिफ्टिंग करत त्यांचे करिअर सुरक्षित करण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे, असे ट्विट मनोज सिन्हा यांनी केले आहे.