राज्यपाल राजेंद्र आर्लेकर , राखी हा धागा नसून ते एक राष्ट्रीय बंधन आहे
पेडणे (प्रतिनिधी )
आपण राज्यात समुद्राच्या किनारी राहणारा अचानक जे आपल्या स्वप्नी होते कि एकदिवस आपल्याला हिमालयाचे दर्शन आणि सीमेवर जावून सैनिकांच्या हातावर राखी बांधण्याचे होते. ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे, आठ दिवसात आपण राखी हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चायना बॉर्डर आहे, त्या ठिकाणी जावून राखी बांधणार आहे, समुद्राच्या तळाची खोली आणि उंच हिमालय या दोघांचे समन्वय राखून मला कार्य हे देशहिताचे करायचे आहे, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नागझर पेडणे येथील शारदा उच्चमाध्यमिक विद्यालय आणि चैतन्य प्रति÷ान यांच्या संयुक्त विद्यमाने ” एक राखी सैनिकासाठी ” या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर केले.
भेंडाळे वजरी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला यावेळी व्यासपीठावर उच्चमाध्यामिक विद्यालयाचे व्यवस्थापक श्रीधर शेणवी देसाई, प्रताप भेंडाळकर, इंडियन आर्मीची मोहंती, कमांडर प्रियमवदा सिंग परी, नेव्हीचे चीफ निवृत्त अधिकारी अनंत जोशी, प्राचार्य गजानन मराठे आदी उपस्थित होते.
ड़ नि÷sने काम करा, देशप्रेम जागवाः राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बोलताना कोणतेही काम नि÷sने प्रेमाने आणि राष्ट्रीय भावनेने करा, आतापर्यंत आपण जे जे काम केले ते राष्ट्रीय भावनेने, भारतीय जनता पार्टीचे जे काम केले तेही त्याच भावनेतून आणि नि÷ा ठेवलेल्या कामाची दखल हि राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. त्याच पद्धतीने आपण आता कोणत्याच राजकीय पक्षाचा सदस्य नाही. मात्र आता राज्यपाल असल्याने त्या पदाची शान राखत असतानाच देश प्रेम कुठेही मागे पडणार नसल्याचे सांगितले.
ड़ राखीचा धागा सैनिकाचे पाठबळः आर्लेकर
आज आम्ही मनमोकळेपणाने जे कार्यक्रम करतो ते केवळ सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकामुळे, त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदर सन्मान असायला हवा. त्याना एकदा तरी आम्ही सलाम नमन करायला हवे. आम्ही त्याचे स्मरण करत असतानाच आमचा एक राखीचा धागा त्या सैनिकांच्या मनगटावर बांधला जाईल त्यावेळी त्या सैनिकांना 10 हत्तीचे बळ मिळेल असे सांगून राखी हा एका धागा नसून ते राष्ट्रीय बंधन असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
ड़ देशाची ताकत युवा पिडीतः आर्लेकर
देशाची ताकत या युवा पिढीत आहे, त्यामुळे देशप्रेम जागवणे गरजेचे आहे. आणि प्रेरणा घेवून काम करायला हवे, आम्हाला वंदेमातरम म्हणण्यासाठी न्यायालयाला सांगाव लागत कि राष्ट्रीय गीत जन गण मन चालू असताना उभे रहावी कि बसावे हा वाद चालू आहे हेच आमचे राष्ट्र प्रेम का असे सवाल आर्लेकर यांनी उपस्थित केला.
ड़ आमच्यात देशात ध्वजारोहण करण्यास मनाई ? राष्ट्रीय हित महत्वाचे आहे, कुठ्ठळी वास्को येथील बेटावर ध्वजारोहण करण्यास एक राजकारणी स्थानिकाना फितूर होवून त्याना भडकावतो आणि मग ते विरोध करतात हेच काय ते त्यांचे राष्ट्रीय प्रेम असा प्रश्न आर्लेकर यांनी उपस्थित केला