दक्षता घेऊनच निर्णय घेतल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने लॉकडाऊनच्या काळात आपल्या कारखान्यांमधील उत्पादन बंद केले होते. ते आता पुन्हा नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. सोमवारी सुरु करण्यात येणाऱया सदर कारखान्यांमध्ये बुधवारपासून उत्पादन सुरु राहणार असल्याचा अंदाज कंपनीने यावेळी व्यक्त केला आहे.
कंपनीने आपले हरियाणामधील गुरुग्रामच्या धारुहेडा आणि उत्तराखंडाच्या हरिद्वारमधील प्रकल्प सुरु केले आहेत. सोबत कंपनीने राजस्थानच्या नीमराणा येथील जागतिक सुटेभाग केंद्राचाही पुन्हा प्रारंभ केला आहे. देशक्यापी लॉकडाऊनच्या तिसऱया सत्रात सरकारने कारखाने सुरु करण्यास नियम व अटीसोबत परवानगी दिली आहे.
कार्याला गती देणार
आम्ही कारखाने दुसऱयांदा सुरु करताना आम्हाला देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे. परंतु अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा नक्याने गतीमान करण्याच्या उद्देशाने आम्ही नव्याने कारखाने सुरु केले असून तेथेही आम्ही पूर्ण खबरदारी घेत उत्पादनाचे कार्य हाती घेणार असल्याचे कंपनीचे चेअरमन पवन मुंजाल यांनी म्हटले आहे.