नवी दिल्ली :
आता कोरोनाच्या संकटाचा प्रभाव विविध उद्योगधंद्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीची सर्वाधिक निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळख असणारी कंपनी आपली सर्व उत्पादन आणि असेंबली प्रकल्प बंद करत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयात भारत , कोलंबिया आणि बांग्लादेश या ठिकाणच्या प्रकल्पाचा समावेश आहे. तरी ही बंदी चालू महिन्यांच्या शेवटपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने तंत्रज्ञान विभागातील कर्मचाऱयांना मात्र घरातून काम करण्याची परवानगी दिली असल्याचे म्हटले आहे, तर अन्य कर्मचारी सुट्टीवर असल्याचे म्हटले आहे.