हिरो गायब मोड ऑन या मालिकेत प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. यामध्ये विश्वयुद्धाच्या सुरूवातीला दंश आपल्या लाडक्या हिरोचा पराभव करतो. दोघांमधील प्रखर युद्ध प्रेक्षकांना रोलर कोस्टर राइडवर घेऊन जाणार आहे आणि आसनांवर खिळवून ठेवणार आहे. हिरोचा पराभव करण्यासाठी दंशसोबत रॉकीने (केशव साधना) हातमिळवणी केल्यामुळे एलियन्सची सेना अधिक प्रबळ बनते आणि एकटय़ाने त्यांचा सामना करणे हिरोला अवघड जाते. दंश पृथ्वीचा विध्वंस करण्याची धमकी देतो आणि मानवजातीला त्रास देण्यास सुरूवात करतो. ज्यामुळे विश्वयुद्ध निर्माण होते. दंश रॉकीच्या मदतीने त्याच्यावर हल्ला करतो आणि प्रत्येक सरत्या क्षणासह हिरोला दंशचा सामना करणे, सोबतच त्याच्या अंगठीचे संरक्षण करणे अवघड जाते. संघर्ष अधिक प्रखर होतो आणि दंश हिरोचा पराभव करत जादुई अंगठी प्राप्त करतो. हिरोची वीर म्हणून ओळख दंश व झारासमोर एकाच वेळी उघडकीस येते. हिरोचा पराभव करत जादुई अंगठी मिळाल्याने दंश आनंद साजरा करू लागतो. पण, हिरोचा शेवट झाल्यानंतर पुढे काय घडणार आहे? हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. या मालिकेत दंशची भूमिका साकारणारा मनिष वाधवा म्हणाला, दंश ही अत्यंत प्रबळ व प्रखर भूमिका आहे. तो कधीच हार मानत नाही आणि सर्व शक्तींसह हल्ला करतो. या फाइट सीक्वेन्ससाठी शूटिंग करण्याचा अनुभव अद्भूत राहिला आहे आणि अभिषेकसोबत काम करताना खूप धमाल येते. हिरोची भूमिका साकारणारा अभिषेक निगम म्हणाला, आम्ही मालिकेमधील आतापर्यंत शूट केलेला हा सर्वात चांगला फाइट सीक्वेन्स आहे. मी भूमिकेमध्ये इतका सामावून गेलो की, भूमिकेमधील ऊर्जा समजू शकलो. शूटिंग करताना माझ्यासाठी हा शिकण्यासारखा अनुभव होता.
Previous Articleतीव उन्हात लॉकडाउन लागू करतेय गरोदर डीएसपी
Next Article पेटीएमद्वारे भरा एलआयसीचा हप्ता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.