कर्ते पुरुष कोठडीत बंद असल्याने पावणे कुटुंबीय हताश
उदय सावंत/गोळावली
गोळवली धनगरवाडा याठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आमच्या कुटुंबाचा किती सहभाग आहे यासंदर्भात आम्हाला माहिती नाही मात्र गेल्या दोन दशकापासून या भागातील धनगर बांधवांनी सुरू केलेल्या उदरनिर्वाहाच्या संघर्षासाठी ही लढाई असल्याची प्रतिक्रिया धनगरवाडा भागातील धनगर बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले आहे.
गेल्या चार दिवसापासून वनखाते व म्हादई अभयारण्याच्या व्यवस्थापनाचा लवाजमा मोठय़ा प्रमाणात वाहने घेऊन या भागामध्ये येत आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून उदरनिर्वाहाचे साधन बनलेल्या आमच्या दुभत्या गाई म्हशी यांचे भक्ष्य करणाऱया वाघाच्या संदर्भात अनेक स्तरावर तक्रारी देऊनही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱया या मंडळीच्या एकूण कार्यक्षमतेवर आज चिंता निर्माण झालेली आहे.
आज याठिकाणी असलेल्या चारही घरांचे कर्ते करविते पुरुष वाघांचा मृत्यू संदर्भात जबाबदार ठेवून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. यामुळे सदर कुटुंबावर मोठे दु:खाचा डोंगर कोसळला असून याचारही कुटुंबातील कर्ते करविते आज वाघांच्या मृत्यूच्या संदर्भात गुन्हेगार म्हणून अटक करण्यात आल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम या कुटुंबातील शिक्षण घेणाऱया मुलावथ याच प्रमाणात संसारावर झाला आहे .येणाऱया काळात सदर करते करविते पुरुष जर कोठडीत राहिल्यास या कुटुंबाचा दुधाचा व्यवसाय पूर्णपणे नष्ट होण्याची भीती असून परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. या कुटुंबाची करून कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी सदर भागांमध्ये भेट देऊन या संदर्भाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर विदारक सत्य समोर आले आहे .यावेळी सदर भागांमध्ये भेट दिली तेव्हा या चारही घरातील कुटुंबे उदासीन अवस्थेत व्हरांडय़ावर बसल्याचे चित्र पहावयास मिळाले .मोडकळीस आलेली घरे व डोक्मयावर वाघाच्या मृत्यू संदर्भात संशयिताना अटक केल्याच्या पार्श्?वभूमीवर भकासपणे डोळे उघडून पाहणाऱया या कुटुंबासमोर अनेक प्रकारचे प्रश्न आजही अनिर्णीत स्वरूपात असल्याचे पहावयास मिळाले .
यासंदर्भात सदर कुटुंबीयाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की गेल्या दोन दशकापासून या चारही कुटुंबाचे अनेक गुरे वाघाने भक्ष्य केलेले आहेत .यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सदर मंडळी आपले जीवन जगत आहेत. एका बाजूने उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनलेल्या दुभत्या जनावरांची चिंता व दुसऱया बाजूने मोठ-मोठय़ाने कोकाटणारे वाघांचे भारदस्त आवाज यामुळे निर्माण झालेली भीती अशा द्विधा मनस्थितीत सदर कुटुंबे आज जीवन जगत आहेत. अनेक गुरे म्हशी वाघांच्या शिकारीचे बळी ठरलेले आहेत यासंदर्भात तक्रारी अनेकवेळा करूनही त्याकडे कोणत्या प्रकारचे लक्ष न देता निष्काळजीपणाचा कळस असलेल्या वनखात्याच्या यंत्रणेला आज या कुटुंबाचा संसार उध्वस्त मजल गेलेली आहे. खुट्टी मारून मठी जोडणाऱया या धनगर समाजाने आतापर्यंत निसर्गाची आपल्यापरीने सेवा केलेली आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या गवळी कुटुंबाचे जीवन पूर्णपणे निसर्गामध्ये व्यथित झालेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुधाच्या धंद्यावर पूर्णपणे आपले जीवन जगणाऱया कुटुंबाने अनेक प्रकारच्या समस्यांना समर्थपणे तोंड देत मुलांच्या भवितव्याची चिंता करीत अनेक प्रकारच्या संघर्षांना समर्थपणे तोंड दिले आहे .आज मात्र या कुटुंबावर प्रचंड प्रमाणात निर्माण झाले असून या काटेरी मार्गातून सदर कुटुंबे कशा प्रकारे आपले जीवन जगणार अशा प्रकारचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले .
यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की गेल्या चार दिवसात ज्या प्रचंड वेगाने धनगर वाडय़ावर वनखाते व सरकारच्या संबंधित यंत्रणेची वाहने फिरताना दिसत आहेत अशा प्रकारची परिस्थिती कधीही आम्ही पाहिलेली नाही. दुचाकी वाहने सुद्धा तारेवरची कसरत करीत आणावी लागतात अशा परिस्थितीत आमच्या कुटुंबाने कधीही अशा प्रकारची गाडय़ांचे लवाजमा बघितला नव्हता. वाघाच्या मृत्युनंतर खऱया अर्थाने सरकारला या भागातील धनगर वाडय़ाची ओळख झाल्याचे चित्र पाहावयास मिळाली. आज मोठय़ा प्रमाणात कर्ते करविते वाघाच्या मृत्यूच्या कारणाखाली कोठडीत जीवन जगत आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. कुटुंबा समोर जीवन जगण्याचा पूर्ण अंधार उभा राहिला असून त्यातून निदान प्रकाश तरी कसा निर्माण होणार अशा प्रकारची चिंता त्यांच्या समोर उभी राहिलेली आहे. या भागातील एकूण पाच जणांना चुकीची माहिती देऊन अटक करण्यात आलेली आहे. अशा अवस्थेत एका कुटुंबाची एक तरुणी यंदा दहावीचे शिक्षण घेत आहे. तिला बऱयाच प्रमाणात मानसिक धक्का बसला असून तिची प्रिलीम परीक्षा आज पासून सुरू होत आहे. मात्र या धक्क्यामुळे ही परीक्षा देऊ शकले नाही.
त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या भागांमध्ये मुक्तपणे फिरणाऱया वाघांच्या भीतीमुळे या कुटुंबातील पुरुष मंडळी या मुलांना आपल्या दुचाकीवरून शाळेत पाठवीत होते. आता मात्र सदर पुरुष मंडळी कोठडीत बंद असल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असून गेल्या दोन दिवसांपासून या भागातील मुलांनी शाळेत जाणे बंद केले आहे. एका बाजूने वाघाच्या मृत्यूमुळे कुटुंबासोबत प्रचंड प्रमाणात निर्माण ालेले संकट व दुसऱया बाजूने शैक्षणिक स्तरावर मुलांचे भवितव्य बंद तर होणार नाही ना अशा प्रकारची शंका या प्रकरणाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून वाघांचे अस्तित्वामुळे या कुटुंबांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाही अनेक स्तरावर कळ सोसली आहे. या निसर्गाचा पुजारी म्हणून धनगर बांधव निसर्गात राहणे हा आमचा गुन्हा आहे का अशा प्रकारचा सवाल व्यक्त करीत असतानाच दुसऱया बाजूने सरकार फक्त पोकळ आश्वासने च्या माध्यमातून स्थलांतर करण्याची भाषा करीत आहे. 199 सारी म्हादई अभयारण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली मात्र अजून पर्यंत म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात राहणारे लोकवस्ती यांच्या प्रस्तावास संदर्भात अजूनही निकाल देण्यात येत नाही खरे दुर्दैव आहे.