ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळय़ा भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रॅलीची खिल्ली उडवली आहे. ही जन आशीर्वाद रॅली नाही तर जन छळवणूक रॅली आहे, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर लगावला आहे.
काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर ?
कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, अशी खोचक टीका महापौर पेडणेकर यांनी केली आहे
दरम्यान, नुकतीच देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केले म्हणून ते पहील्या 5 नंबर मध्ये आले आहेत. विरोधकांचे मीठ आळणीच राहिले आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसेही आम्हांला कुणी टार्गेट केले तरी काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.