प्रतिनिधी / बेळगाव
17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मांना अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे. कंग्राळी खुर्द येथे 8 वाजता उपस्थित रहायचे असून मारुती बेन्नाळकर चौक येथे हजर रहावे, असे कळविण्यात आले आहे.
तत्कालीन म्हैसूर राज्यामध्ये सीमाभागातील मराठी बहुलभाषिक भाग अन्यायायने डांबण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर, औराद यासह समस्त मराठी भाषिकांचा भूभागावर अन्याय झाला. त्याविरोधात मराठी भाषिकांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये मारुती बेन्नाळकर, महादेवी बारागडी, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे हे हुतात्मे झाले तर निपाणी येथे कमळाबाई मोहिते यांनाही वीरमरण आले. या सर्व हुतात्मांना अभिवादन करायचे असून सीमाभागातील मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कंग्राळी खुर्द येथे होणाऱया या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा ब. पाटील या राहणार आहेत. तरी अभिवादनासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावेत, असे आवाहन अध्यक्ष मारुती झंगरुचे, उपाध्यक्ष सुरेश डुकरे, यल्लाप्पा बेळगावकर, अशोक पाटील, पिराजी मुचंडीकर व सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले आहे. मोठय़ा संख्येने उपस्थित रहा
केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना 25 लाख मराठी माणसांचा मराठी मुलुख केंद्र सरकारने अन्यायाने त्यावेळेच्या म्हैसूर राज्यात डांबला. 17 जानेवारी 1956 रोजी हा सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय करण्यात आला. त्यानंतर त्याविरोधात प्रचंड मुकमिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी बेच्छुड गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये पाच जण हुतात्मे झाले. त्यांना दरवषी प्रमाणे 17 जानेवारी रोजी अभिवादन करायचे असून मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले.
पोलिसांच्या गोळीबारात मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी तर निपाणी येथे कमलाबाई मोहिते हे पाच जण हुतात्मे झाले. त्या सर्वांना रविवार दि. 17 रोजी सकाळी 9.30 वाजता कंग्राळी खुर्द येथील बाळू निलजकर यांच्या फोटोचे पूजन करुन अभिवादन करण्यात येणार आहे. समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, युवा व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड-19 चे सर्व नियम पाळत अभिवादन करयाचे आहे. तरी याची दखलही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस एल. आय. पाटील, खचिनदार एस. एल. चौगुले, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी हे आवाहन केले आहे.