सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांनी पुढाकार घ्यावा
बेळगाव
17 जानेवारी हुतात्मादिन सीमाभागात सर्वत्र गांभीर्याने पाळण्यात आला. बेळगाव शहरासह तालुका, खानापूर, निपाणी येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा चौक येथे झालेल्या अभिवादनप्रसंगी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले की, सीमाप्रश्न हा लोकसभेने निर्माण केलेला प्रश्न आहे. त्यामुळे त्याची सोडवणूक लोकसभेत होणे गरजेचे आहे. तसेच हा
प्रश्न महाराष्ट्राने सोडवण्यासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाषावर प्रांतरचना सदोष पद्धतीने झाली. त्यामुळे बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात गेला आहे. हा संपूर्ण भाग महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे हा प्रश्न हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्रीय नेत्यांनी पावले उचलणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी दीपक दळवी आणि मालोजी अष्टेकर यांनीही आपले विचार मांडले.
प्रारंभी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तेथून अभिवादनफेरी काढण्यात आली. रामदेव गल्ली, महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली या मार्गाने अनसुरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली आणि किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौक येथे आली. फेरीत सहभागी झालेल्या सदस्यांनी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेलमे अशा घोषणा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोड येथेही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही अभिवादन फेरी पुन्हा हुतात्मा चौक येथे आली. या ठिकाणी मान्यवरांनी आपले विचार मांडले. हुतात्मा दिनाच्या या अभिवादनप्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, माजी नगरसेवक पंढरी परब, बाळासाहेब काकतकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, सीमाभाग शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनूरी यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.
हुतात्मादिनप्रसंगी उपस्थितांमध्ये किरण गावडे, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, शिवाजी हंडे, ज्ये÷ कार्यकर्ते गजानन धामणेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, संभाजी चव्हाण, राजू आजगावकर, मनोहर हलगेकर, विजय भोसले, सुनील बाळकुंद्री, विजय पाटील, मोहन बेळगुंदकर, राजू बिरजे, राकेश पलंगे, गजानन पाटील, विनायक गुंजटकर, धनराज गवळी, दिनेश रावळ, दिलीप बैलूरकर, माजी महापौर महेश नाईक, आप्पासाहेब पुजारी, कल्लाप्पा प्रधान, पांडुरंग चिगरे, रामा शिंदोळकर, रवी साळुंखे, राजकुमार बोकडे, सुनील बोकडे ,राजू वरपे, रवी धनुचे, सतीश गावडोजी, अजित कोकणे, पुंडलिक मोरे, ऍड. राजाभाऊ पाटील, शुभम शेळके, श्रीकांत कदम, मोतेश बारदेशकर, राजू पाटील, दत्ता जाधव, परेश शिंदे, संजय जाधव, विश्वजीत चौगुले, चेतन शिरोळकर, राजेश शहापूरकर, सागर पाटील, सुनील जाधव, महादेव पाटील, मदन बामणे, दीपक किल्लेकर, विनायक हुलजी, प्रकाश मरगाळे, रमेश पावले, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, मीनाक्षी चिगरे, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इंदू घोरपडे, मेघा किल्लेकर, रेणू मोरे, अर्चना कावळे, आशा सुपले, शांता मेलगे, प्रिया कुडची, श्रद्धा मंडोळकर, राजश्री बडमंजी, राजश्री बांबुळकर, अनुपमा कोकणे आदी उपस्थित होते.