मनीषा सुभेदार
‘परस्परांशी बोलत रहा… एकटे राहण्याचे टाळा…. आनंद असो किंवा दुःख असो ते इतरांना सांगण्याची सवय लावून घ्या, कोरोनाने माणसाला माणसांपासून दूर केले. आयसोलेट राहण्यास भाग पाडले. माणूस एकटा पडला की, त्याच्यावर ताण वाढतो आणि हा ताण हृदयासाठी घातक ठरु शकतो. म्हणूनच हृदयाचा हृदयाशी संवाद सुरू ठेवा. प्रत्यक्ष भेट अशक्मय असली तरी डिजीटल माध्यमातून बोलत रहा…’ हा सल्ला दिला आहे, नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी.
आज जागतिक हृदयदिन. यंदाच्या हृदयदिनाचे घोष्यवाक्मय आहे ‘डिजीटल हेल्थ’. ही आधुनिक काळाची नवीन संकल्पना आहे. ‘भेट अशक्मय तरी संवाद शक्मय’, हे आजच्या जगाचे सूत्र ठरणार आहे. या अनुषंगाने डॉ. दीक्षित यांची ही मुलाखत.
प्रश्नः- हृदय किती महत्वाचे व त्याची रचना आणि कार्य काय?
उत्तरः-आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय होय. शरीरातील सर्व अवयव दोन आहेत. परंतु हृदय एकच आहे. हृदयाला तीन रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात. हृदयाला जर पंपींग होत नसेल तर आपण काहीच करु शकत नाही. आपल्या हालचाली बंद होतात. त्यामुळे हृदय किती महत्वाचे हे लक्षात येईल.
शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया हृदयामुळे कार्यरत राहते. हृदयाला 4 कप्पे असतात. त्याच्या सहाय्याने रक्ताभिसरण होते. हृदयाचे वजन 300 ग्रॅम असते. दिवसभरात हृदयाचे 1 लाख ठोके पडतात. आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त फेफडय़ाकडे जाऊन शुद्ध होऊन परत हृदयाकडे येते. हृदयाच्या इलेक्ट्रीकल सिस्टीममध्ये बिघाड झाला तर नैसर्गिक पेसमेकर क्षीण होतो व कृत्रिम पेसमेकर बसविला जातो.
प्रश्नः- कोरोनरी व सेप्टम म्हणजे काय?
उत्तरः- हृदयाच्या डाव्या व उजव्या भागामध्ये विभाजन करणारा जो पडदा असतो त्याला सेप्टम म्हणतात. हृदयावर असलेली वाहिनी ही क्राऊन (मुकूट) प्रमाणे असते. म्हणून कोरोनरी हा शब्द रुढ झाला आहे. तिच्यातर्फे हृदयाला रक्तपुरवठा केला जातो. हृदयात पंपींग सुरू झाले की ते रक्त रक्तवाहिनीला जाते व तेथून हृदयाला पुन्हा रक्तपुरवठा होतो.
प्रश्नः- अलिकडे हृदयविकार व तत्सम विकाराची कारणे कोणती?
उत्तरः- कारणे अनेक आहेत. तंबाखूचे सेवन, धुम्रपान, अतिमद्यपान याव्यतिरिक्त अलीकडे अकार्यक्षमता म्हणजेच शारीरिक हालचालींचा अभाव व चुकीची आहार पद्धत ही कारणे आहेत. श्रम नसल्याने मेद वाढतो. त्यामुळे मधुमेहही होतो आणि हृदयालाही इजा पोहोचू शकते. तळलेले पदार्थ, मिठाई यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. प्रथिने, पालेभाज्यांचा समावेश करायला हवा. स्थुलत्व वाढल्यास मधूमेह व हृदयविकाराची समस्या उद्भवू शकते.
प्रश्नः- कोरोना काळात हृदयविकारानेसुद्धा माणसे दगावली याचे कारण काय?
उत्तरः- हा खूप महत्वाचा आणि विचार करण्याजोगा प्रश्न आहे. कोरोनाने लोकांना ‘डिसकनेक्ट’ केले. म्हणजेच माणसांना माणसांपासून दूर केले. आयसोलेशनमुळे माणसाला एकटे रहावे लागले. मुळात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एकटे राहिल्याने त्या व्यक्तींच्या हृदयांवर विलक्षण ताण आला आणि हृदयविकाराच्या झटक्मयाचे प्रमाण वाढले. दुसरी बाब म्हणजे लॉकडाऊनमुळे अनेक रुग्णांना नियमीत तपासणी करणे शक्मय झाले नाही. परिणामी त्यांच्या बीपी आणि शुगरचा अंदाज आला नाही. तसेच लस घेतली तरी त्याची रिऍक्शन होऊन रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण वाढले, हे सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचे महत्वाचे कारण ठरले.
प्रश्नः- अजूनही कोरोना गेला नाही, अशावेळी लोकांनी कोणती काळजी घ्यावी?
उत्तरः- ‘पेंडय़ामीक’ जोपर्यंत ‘एन्डॅमिक’ (पूर्णतः संपणे, नष्ट होणे) होत नाही तोवर प्रत्येकाने काळजी घेणे भाग आहे. परंतु याचे भानच राहिलेले नाही. मास्क घालणे, अंतर राखणे, गरज असेल तरच बाहेर पडणे, सॅनिटाईझ करणे, वारंवार हात धुणे या सवयी सोडून चालणार नाही. यापुढे वेगवेगळे विषाणू येत राहतील. त्यामुळे या सवयी आपल्या जगण्याचा भाग झाल्या पाहिजेत.
प्रश्नः- बऱयाचदा छातीत दुखल्यास ऍसीडीटी म्हणून दुर्लक्ष केले जाते, याबद्दल काय सांगाल?
उत्तरः- छाती, मान, दात, डोके, पाठ यापैकी कोणताही अवयव दुखल्यास आणि घाम आल्यास ती ऍसीडीटी नव्हे. यापूर्वी कधीही दुखले नव्हते आणि अचानक दुखणे वाढले व घाम आला तर कदाचित हार्टअटॅक असू शकतो. दुसरे म्हणजे काम करताना, चालताना, जिने चढताना दुखणे सुरू झाले व काम थांबविल्यावर त्याची तीव्रता कमी झाली असे होत असेल तर हृदयाशी संबंधीत समस्या निर्माण झाली आहे, हे ओळखावे. बऱयाचदा रुग्ण सोडा पितात, इनो घेतात, अस्वस्थ वाटल्यास फॅमिली डॉक्टरकडे जातात. इसीजी काढतात तोवर हृदयाची बरीच हानी होते. रुग्ण सहा तासांच्या आत आल्यास रक्तवाहिनीत झालेली गुठळी लगेच नष्ट करुन हानी टाळता येते.
प्रश्नः- अशी लक्षणे आढळल्यास किती वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे?
उत्तरः- जितक्मया लवकर शक्मय आहे तितक्मया लवकर पोहोचायला हवे. ब्लॉक लवकर काढल्यास हृदयाला फारशी इजा पोहोचत नाही. सहा तासांच्या आत डॉक्टरकडे पोहोचणे आवश्यक आहे. सहा तासानंतर हृदयाचे स्नायु क्षीण होतात.
प्रश्नः- ऍजिओग्राफी, ऍजिओप्लास्टी व बायपास म्हणजे काय?
उत्तरः- ऍजिओ म्हणजे हृदयाची रक्तवाहिनी. ग्राफी म्हणजे चित्र, हृदयावरील रक्तवाहिनीचे चित्र घेणे म्हणजे ऍजिओग्राफी. हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा आल्यास स्प्रिंग बसविली जाते. या वाहिनीजवळून एक वायर पास करुन त्यावरुन बलुन पास केला जातो. फक्त बलून बसविल्यास रक्तवाहिनी पुन्हा ब्लॉक होण्याची शक्मयता वाढते. पण स्प्रिंगमुळे ही शक्मयता 40 टक्क्मयावरुन 6 ते 10 टक्के खाली येते. त्याला ऍजिओप्लास्टी म्हणतात. बायपास म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यास दुसरी रक्तवाहिनी जोडून तेथून रक्तपुरवठा केला जातो.
प्रश्नः- कोणतीही लक्षणे नाहीत तरीही चाचणी (टेस्ट) करुन घेणे किती आवश्यक आहे?
उत्तरः- वयाच्या पस्तीशीनंतर प्रत्येकाने चेकअप करुन घेणे आवश्यक आहे. पूर्वी हे वय 40 होते. आज ते 35 झाले आहे. म्हणजेच लहान वयातसुद्धा हृदयविकाराच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसादिवशी ब्लडशुगर, कोलेस्ट्रॉल, इको ऍन्ड स्ट्रेस टेस्ट करुन घ्यावी. गुडघेदुखी किंवा लठ्ठपणा असल्यास सीटीस्कॅन करुन घ्यावे व मगच वाढदिवसाचा केक कापावा.
प्रश्नः- आजच्या दिनानिमित्त कोणता संदेश द्याल?
उत्तरः- यंदाचे घोषवाक्मय डिजीटल हेल्थ असे आहे. म्हणजेच डॉक्टरांकडे प्रत्यक्ष जाण्याची गरज किंवा परिस्थिती नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सींग करुन आपण डॉक्टरांशी संपर्क करु शकतो. याच माध्यमातून आपली औषधे, आपल्या तक्रारी, आपला आहार हे सर्वांबाबत चर्चा करुन सल्ला घेता येऊ शकतो. कोरोनाच्या काळात हेच माध्यम उपयुक्त ठरले म्हणूनच यंदाचे घोषवाक्मयसुद्धा डिजीटलवर भर देणारे आहे.
टिप्स
- बैठे काम असल्यास मध्येमध्ये चालून या
- सकाळी चालण्याचा सराव ठेवा
- छातीत जड झाल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
- तंबाखूचे सेवन वर्ज्य करा
- छातीत दुखणे हे गॅसचे लक्षण नव्हे
- पस्तीशीनंतर सर्व तपासण्या करुन घेणे गरजेचे आहे.
- सर्वात महत्वाचे म्हणजे परस्परांशी बोला व ताण टाळा