ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमधील 14 अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेवरुन चीनने ग्लोबल टाईम्समधील लेखात बिपिन रावत यांच्या निधनावर बोलताना गरळ ओकली आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेसाठी भारतीय लष्करातील त्रुटी जबाबदार असल्याचे चीनने म्हटले आहे.
चीनने ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे की, भारतीय लष्करात शिस्तीची कमतरता तसेच लढण्याची अपूर्ण तयारी दिसत आहे. लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला असून, हा दीर्घकाळ राहील. त्यामुळे लष्करातील या त्रुटी दूर करण्याची गरज आहे. या लेखात बिपीन रावत यांचा उल्लेख चीनविरोधी असा करण्यात आला आहे. बिपिन रावत यांच्या निधनामुळे बेशिस्त लष्करील सरकारचे नियंत्रण सुटू शकते आणि सीमेवरील स्थिती हाताबाहे जाऊ शकते.
दरम्यान, जोपर्यंत हवामानात सुधारणा होत नाही तोपर्यंत उड्डाण थांबवलं असतं, पायलटने अधिक काळजीपूर्वक किंवा कुशलतेने उड्डाण केलं असतं तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती, असेही चीनने म्हटले आहे.