रत्नागिरी/प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठीराज्याचे मुख्यमंत्री कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच आपण हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसहि पाहणीसाठी गुरुवार पासून कोकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जास्त फिरत बसण्यापेक्षा जे महत्वाचं आहे त्यावर आपण लक्ष केंद्रीत करत आहोत असं सांगितलं.
“नुकसान झालेल्यांना मदतीचे तात्काळ आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पंचनामेपूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले.