शासकीय अन् कायदेशीर वाद सोडविता येणार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
देशातील पहिले इंटरनॅशनल अँड मीडिएशन सेंटरचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमना आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी संयुक्तपणे उद्घाटन केले आहे. 25 हजार चौरस फूट आकारात निर्माण या केंद्रात चर्चा आणि मध्यस्थीद्वारे कायदेशीर प्रकरणे निकालात काढली जाणार आहेत.
भारतासह सर्व क्षेत्रीय देश आणि नागरिकांची प्रलंबित कायदेशीर प्रकरणे सिंगापूर आणि ब्रिटनच्या मध्यस्थी केंद्रांमध्sय निकालात काढली जात होती. परंतु हैदराबादमध्ये हे मध्यस्थी केंद्र सुरू झाल्याने आता ही प्रक्रिया देशातच पार पडणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी या प्रतिष्ठित संस्थेच्या स्थापनेसाठी हैदराबादची निवड केल्याप्रकरणी सरन्यायाधीशांचे आभार मानले आहेत. हैदराबादमध्ये केंद्रासाठी लवकरच भूखंड प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या भूखंडावर मीडिएशन सेंटरची इमारत उभारली जाणार आहे.
नवे केंद्र मध्यस्थीद्वारे वाद सोडविण्याप्रकरणी भारतातच नव्हे तर पूर्ण जगात स्वतःचा नावलौकिक कमावेल असा पूर्ण विश्वास आहे. केंद्राच्या स्थापनेचे कार्य अत्यंत कमी वेळेत झाले असून हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे उद्गार सरन्यायाधीशांनी काढले आहेत. याप्रकरणी सरन्यायाधीशांनी मुख्यमंत्री राव यांच्याशी 12 जून रोजी पहिल्यांदा चर्चा केली होती. त्यानंतर कोरोना संकट असतानाही हे कार्य काही महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे.
मध्यस्थी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ात सरन्यायाधीश रमना यांच्याह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एल. नागेश्वर राव, हिमा कोहली आणि आर.व्ही. रविंद्रन यांनी भाग घेतला. याचबरोबर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील यात सामील झाले.