प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस मुंबई, पुणे, मालेगाव आणि ठाणे या जिह्यात वाढताना दिसत आहेत. त्या जिह्यातील चाकरमानी सातारा जिह्यात येऊन जिह्यातील इतर नागरिकांना बाधा पोहचू शकते. त्यामुळे जिह्यातील आकडेवारी वाढू शकते. जिह्याच्या काळजीपोटी सातारा जिल्हाधिकाऱयांनी तेथील जिल्हाधिकाऱयांना सातारा जिह्यात येण्याचे परवाने देऊ नका, अशी विनंती केली आहे. त्यामुळे जिह्यात हॉटस्पॉट असलेल्या जिह्यातून येण्यासाठी आता मनाई केली आहे. जिह्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बाब असली तरी मुंबई व पुण्याहून गावाला येणाऱयांची चांगलीच गोची झाली आहे.
सातारा जिह्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह हे कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, काही नागरिकांच्या अट्टाहासापोटी आकडा वाढत चालला आहे. घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन करून ही बाहेर पडणारे अनेकजण दिसतात. सरकारने मजुरांना त्यांच्या गावी जाण्याचे परवाने देण्याची प्रक्रिया सुरू करताच मुंबई, पुण्यात अडकून पडलेले सातारा जिह्यातील चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. ऑनलाईन परवाने घेऊन मिळेल त्या गाडीने पाहिजे तेवढे भाडे देऊन गाव गाठताना दिसत होते.
लॉकडाऊनमध्ये महामार्ग मुंबई, पुणे बाजूकडून गर्दी झाल्याचे चित्र दिसू लागले. जिह्यातील प्रत्येक गावात मुंबई, पुणे येथील चाकरमानी दिसू लागले. हा एकप्रकारे धोका वाढण्याची शक्यता गृहीत धरून सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तेथील प्रशासनास सातारा जिह्यात येण्याची परवानगी देऊ नका, अशी विनंती केली आहे. त्यामुळे जिह्यात पुणे, मुंबई, ठाणे, मालेगाव या हॉटस्पॉट जिह्यात येण्याकरता ऑनलाईन परवाने मिळत नाहीत, अशी खात्रीपूर्वक माहिती आहे. त्यामुळे तेथून जिह्यात येणाऱयांची चांगलीच गोची झाली आहे.
जिह्यात आलेल्या मंडळीनी काळजी घ्यावी
मुंबई, पुणे येथून जे सातारा जिह्यात स्वतःच्या गावात आले आहेत. त्या मंडळींनी स्वतःची आणि गावची काळजी घ्यावी, स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे, घराबाहेर पडू नये, लक्षणे आढळून आल्यास लगेच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. खरी माहिती दडवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यलयातून करण्यात आले आहे.