ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीन सैन्यातील तणाव कमी झाला असला तरी दोन्ही देशातील सीमावाद अद्याप सुरूच आहे. 9 एप्रिल रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कमांडर स्तरावरील चर्चेनंतर चीनने हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टमधून आपले सैन्य मागे घेण्यास नकार दिला. यामुळे दोन्ही देशात पुन्हा तणाव निर्माण होत आहे. एका वर्तमानपत्राने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्यात सुरू असलेल्या या संघर्षाला आता एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात सीमा वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. परंतु, अद्याप या वादावर कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.