सांगली /प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. या वाढत्या संख्येचे ऑडिट करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले.
रविवारी सांगलीत समस्त मुस्लिम समाज समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हकीम लुकमन कोविड सेंटरचे उद्घाटन रविवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ना. पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या खर्चाच्या ऑडिटसाठी शासनाने लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे , पण जिल्ह्यातील पुरवणार रुग्णांचा डेथ रेट राज्यात सर्वाधिक आहे, याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे ऑडिट करणे महत्वाचे आहे. रुग्ण दवाखान्यात उशिरा दाखल असे महत्त्वाचे कारण आहे, तसेच ज्यांच्या नावावर रुग्ण दाखल होतात ते डॉक्टरच रुग्णाच्या जवळ जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे त्यामुळे उपचाराच्या प्रक्रियेचे ही ऑडिट होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी बेडची संख्या लवकरच चार हजार पर्यंत वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.