स्मशानभूमी बकाल अवस्था, 15 दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास जि. प. निवडणुकीवर बहिष्कार
वाळपई / प्रतिनिधी
होंडा पंचायत क्षेत्रातील नारायणनगर भागांमध्ये गेल्या वीस वर्षापासून रस्त्याची डागडुजी झालेले नाही. येथील स्मशानभूमीच्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तसेच मैदानावर खेळण्यासाठी क्रीडापटूंना अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा अनेक समस्यांनी नारायण नगर भाग ग्रासलेला असून याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास सर्व नागरिक एकजूट होऊन येणाऱया जिल्हा पंचायत व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा दिला आहे.
नारायणनगर भागातील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नागरिकांनी सरकारच्या याभागातील विकासासंदर्भात निष्काळजीपणा करीत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सत्तरी तालुक्मयातील होंडा पंचायत क्षेत्र महसुलाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर आहे. या भागात जवळपास अडीचशेच्या आसपास घरे आहेत. मात्र हा भाग विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत पीछाडीवर आहे. अनेक प्रकारची निवेदने देऊनही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केला.
वीस वर्षापासून रस्त्याची मागणी प्रलंबित : प्रसन्ना भांगले
वीस वर्षापासून या रस्त्यावर हॉटमिक्सद्वारा डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे अजून पर्यंत गांभीर्याने लक्ष दिलेले नाही असे प्रसन्ना भांगले यांनी सांगितले. सत्तरी तालुक्मयाच्या सर्व पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले .मात्र या भागांतील रस्त्याचं डांबरीकरण झालेले नाही. यामुळे जोपर्यंत या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होत नाही तोपर्यंत येणाऱया जिल्हा पंचायत व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असेही भांगले यांनी सांगितले.
तर स्मशानभूमीचे काम नागरिक स्वतः करणार : गौरीष मळकर्णेकर
या वाडय़ावर स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे .मात्र गेल्या अनेक वर्षापासून या स्मशानभूमीकडे जाणाऱया रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. स्मशानभूमीला भयानक रूप प्राप्त झाले असून त्याचीही डागडुजी करावी अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केलेले आहे. सरकारने या स्मशानभूमीची डागडुजी न केल्यास नागरिक स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भातील व्यवस्था करणार असल्याचे गौरीष मळकर्णेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
रस्त्याचे टेंडरिंग झाले मात्र अजून पर्यंत आदेश नाही : पूर्णाली केरकर
या भागाच्या पंच सभासद पूर्णाली केरकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना रस्त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. यारस्त्याचे टेंडरिंगचा प्रस्ताव वर्षांपूर्वी सुदिन ढवळीकर यांच्या मदतीने मंजूर झाला होता. सदरचे कॉन्ट्रक्ट हुसेन नामक कॉन्टॅक्टरला यांनी घेतले होते. मात्र त्यांनी आपल्याला काम परवडणारे नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर यासंदर्भात कॉन्ट्रक्ट दुसऱया एका कॉन्टॅक्टला दिलेले आहे .मात्र त्याला अजून पर्यंत काम सुरू करण्याचा आदेश प्राप्त न झाल्यामुळे रस्त्याचे काम सुरू होऊ शकत नसल्याचे माहिती स्थानिक पंचायत सभासद पुर्णाली केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सरकार या वाडय़ावर विकासाच्या बाबतीत का दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारचा सवाल पूर्णली केरकर यांनी यावेळी स्पष्ट केला.त्याचप्रमाणे स्मशानभूमीचे अत्यंत वाईट अवस्था झाली असून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले.