ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सतत भारत चीन सीमा विवादावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी केलेल्या टीकेला लडाखचे आमदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी उत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांनी चीनने लडाखमध्ये भारतीय प्रदेशात अतिक्रमण केले आहे का? असा सवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केला होता. याला लडाखच्या भाजपच्या आमदारांनी उत्तर दिले आहे. जामयांग सेरिंग नामग्याल म्हणाले की, चीनने या भागांवर कब्जा केला आहे असे म्हणत एक नकाशा देखील ट्विट केला आहे.
पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, चीनने आमच्या भागावर कब्जा केला आहे पण तो काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये. तसेच त्यांनी काँग्रेसच्या कारकिर्दीत चीनने आक्रमण केलेल्या भागांची यादीदेखील दिली आहे.
पुढे ते म्हणाले, मला आशा आहे की, माझ्या या उत्तराने राहुल गांधी आणि काँग्रेस संतुष्ट होतील. तसेच त्यांनी यासाठी अक्सई चीन ते पांगनाक आणि चाबजी व्हॅली, डूम चेला यासारखी उदाहरणे दिली आहेत.