ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीन सीमावादावर सतत केंद्र सरकारवर निशाणा साधणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ट्विटवर भाजपचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल गांधींनी मंगळवारी एका ट्वीटमध्ये राजनाथ सिंह यांना लक्ष्य केले होते. ज्यात त्यांनी लडाखच्या भारतीय सीमा हद्दीत चिनी सैन्य घुसले आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर एका ट्वीटमध्ये राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर विटंबना करताना ‘हात’चा उल्लेख केला होता, त्यानंतर राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,’ जर ‘हात’ बद्दल बोलले गेले असेल तर सरकार हे सांगेल का की, चीनने लडाखमध्ये भारतीय सीमेवर कब्जा केला आहे ?
राहुल गांधींच्या या प्रश्नाला उत्तर देताना नामग्याल म्हणाले, “होय, चीनने भारतीय प्रदेश ताब्यात घेतला आहे. पण तो काँग्रेसच्या काळात.
काँग्रेसच्या राजवटीत 1962 मध्ये अक्साई चीन (37,244 चौरस किमी), 2008 मध्ये चमुर भागात टीआ पांगनाक आणि चाबजी व्हॅली (लांबी 250 मीटर), 2008 मध्ये डेमाझोक येथील झोराव्हर किल्ला उद्ध्वस्त केला गेला होता आणि 2012 मध्ये पीएलएचे निरीक्षण पॉईंट स्थापन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त न्यू डेमजोक कॉलनी तयार करण्यासाठी सिमेंटमधून 13 चिनी घरे बांधली गेली. यूपीएच्या कारकीर्दीत 2008-08 मध्ये भारताने डेमजोक आणि दुंग्टी दरम्यान डूम चेली (प्राचीन व्यापार पॉईंट) गमावला. 2012 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात भारतीय भूभागांवर चीनच्या सैन्याने नकाशा प्रसिद्ध केला होता.
तसेच नामग्याल यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मला आशा आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस तथ्यांच्या आधारे माझ्या उत्तरावर सहमत होतील आणि आशा आहे की ते पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.’