आरजीचे मनोज परब यांनी व्यक्त केला निर्धार. मुख्यमंत्र्यांचा साखळीत पडाव करणार. विनाकारण पोलीस बळ वापरून ताब्यात घेतल्याने परब आक्रमक.
प्रतिनिधी /डिचोली
गोवा विधानसभेत आरजीने तयार केलेले आणि गोव्यातील सुमारे 25 हजार लोकांच्या स्वाक्षऱया असलेले “पोगो” बील मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी जाणार असल्याचे समजताच आपल्याला पोलिसांनी बेकायदेशीरपणे आपल्या घरातून ताब्यात घेऊन डिचोली पोलीस स्थानकावर आणून ठेवले. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आपण साखळीत निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या काळजात धडकी भरली असून या प्रकारामुळे आता आपण साखळीतच निवडणूक लढविण्यासाठी मनात गाठ बांधली आहे, असा निर्धार आरजीचे सर्वैसर्वा मनोज परब यांनी डिचोली येथे व्यक्त केले.
डिचोली पोलीस स्थानकात मनोज परब यांना संध्याकाळपर्यंत ताब्यात घेऊन ठेवण्यात आल्यानंतर डिचोली उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केल्यानंतर सोडण्यात आले. त्यांना जामिनावर सही करण्यासाठी पोलिसांनी सांगितले असता सदर ताब्यात घेण्याची कृती बेकायदेशीर असल्याने आपण सदर जामिनावर सही केदी नाही. असेही मनोज परब यांनी सांगितले. या सरकारला गोव्यातील जनतेचे काहिच पडून गेले नसल्याने आज त्यांनी दाखवून दिले आहे. कारण पोगो विधेयक विधानसभेत सादर करण्यासाठी गेले असता ते साधे इनवर्डही करून घेतले गेले नाही. तसेच एका “बर्वे” नामक व्यक्तीने फोन करून सदर विधेयक इनवर्ड करून घेऊ नये असा दबाव विधानसभेतील कर्मचाऱयांवर आणला. हि कृती अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. तसेच सदर विधेयक इनवर्ड करण्यासाठी गेलेल्या आरजीच्या दोन सदस्यांना पर्वरी पोलीस स्थानकात ताब्यात घेऊन ठेवणे हि कृत्रीही बेकायदाच आहे, अशी टिका मनोज परब यांनी यावेळी केली.
काल शुक्र. दि. 30 जुलै रोजी साखळीत आरजीची एक बैठक होती ती रद्द झाली. मात्र पुन्हा आपच साखळीत बैठक घेणारच असून दम असल्यास ती अडवून दाखवा, असे आव्हान मनोज परब यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. साखळीत आपण विधानसभा निवडणुकीत उतरणारच असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पडाव करणारच. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यापेक्षा वाईट परिस्थितीत डॉ. सावंत यांचा पराभव करणार, असा इशारा परब यांनी दिला. आम्ही आमच्या पध्दतीने आमचे आंदोलन आणि वाचारसरणी पुढे नेत असताना सरकार मात्र आमच्यावर विनाकारण पोलीस बळाचा वापर करून अन्याय करीत आहे. आज आपल्याला डिचोली पोलीस स्थानकावर आणल्यानंतर आपण येथे हजारोंच्या संख्येने युवा सदस्यांचा जमाव करू शकलो असतो. मात्र आमचे सदस्य सत्तरी भागातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी झटत आहेत. त्यांच्या या कार्यात अडथळा नको म्हणून त्यांना पाचारण केले नाही. मुख्यमंत्री पोलीस बळाचा वापर करून जितके चिथावण्याचा प्रयत्न करणार तितकेच आम्ही मजबूत होत जाणार. या सरकारला आणि मुख्यमंत्र्यां?ना गोवेकरांचे पडून गेलेले नाही त्यांना केवळ बिगरगोमंतकय मतपेठीचेच अधिक सोयर सुतक लागते. त्यांनी आपले सल्लागार बदलावे. सल्लागारांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळेच आज मुख्यमंत्री प्रत्येक कामात तोंडघशी पडत आहेत. गोव्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केल असून आतातरी मुख्यमंत्र्यांनी आपले सल्लागार बदलावे, असेही यावेळी मनोज परब यांनी म्हटले.