राजा जनकाने आपले भौतिक ऐश्वर्य सासरी जाणाऱया आपल्या चारही कन्यांना भेट म्हणून दिले. राजा दशरथ आपले चारही मुलगे आणि सुना, तीन राण्या, अयोध्येहून आलेल्या आप्तस्वकीय यांच्यासह स्वतःचे सैन्य बरोबर घेऊन अयोध्येला निघाला. तेव्हा वाटेत ह्रदय कंपित करणारा अनुभव त्याला आला. एकाएकी अंतरिक्षात पक्ष्यांचा भयंकर आवाज होऊ लागला तर सारे पशु राजाच्या बाजूने जाऊ लागले. त्या दृश्याने दशरथाच्या मनात काहीतरी अशुभ घडणार याची चाहूल लागली. जरी तो भ्याड, भित्रा, पळपुटा नव्हता, पराक्रमी सम्राट होता, तरी काही काळ त्याच्या मनात मनुष्यस्वभावानुसार भय निर्माण झाले हे खरेच!
त्याची ही अवस्था ओळखून कुलगुरु वसि÷ांनी त्याला आश्वस्त केले. तेवढय़ात प्रचंड झंझावात निर्माण झाला. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडू लागले. सारे सैन्य धुळीच्या वादळाने झाकोळून मूर्च्छित पडले जणू! साऱयांचे दिशांचे भानच हरपून गेले. महषी वसि÷, इतर मुनी आणि दशरथासह चार पुत्र तेवढे शुद्धीवर होते. तेवढय़ात त्यांच्यासमोर रामायणात वर्णन केल्याप्रमाणे ‘क्षत्रियांतक, भयंकर दिसणारा, जटाधारी, कैलासाप्रमाणे धिप्पाड, अत्यंत तेजस्वी, प्रलयकालीन अग्नीप्रमाणे दुःसह, अत्यंत तेजस्वी असल्याने सामान्य लोकांना पाहण्यास अशक्मय असा भार्गवपुत्र परशुराम राजा दशरथाने पाहिला. त्याने खांद्यावर परशु आणि विजेसारखे तळपणारे धनुष्य हाती धरले होते. त्रिपुरांतक शिवाप्रमाणेच तो दिसत होता.’ नंतर सर्व ऋषींनी उग्रदर्शन अशा त्या भार्गवरामाचे पूजासाहित्य आणून पूजन केले. ‘हे राम, हे राम’ असे त्याला मधुर स्वराने उच्चारू लागले. तेव्हा त्या जमदग्नीपुत्र रामाने त्याचा स्वीकार केला आणि नंतर तो दाशरथी रामाशी बोलू लागला.
तपस्वी परशुरामाची पार्श्वभूमी सात्विक नसून उग्र होती. त्याच्या चरित्राला क्षत्रियसूडाची एक किनार होती. त्याचा पिता जमदग्नी हा तपोमूर्ती असूनही क्रोधमूर्ती म्हणूनच प्रसिद्ध होता. तो जन्मजातच तसा होता. पण परशुराम मूळचा तसा नव्हता. तो तपोवनात रमणारा, ब्रम्हचारी, व्रतधारी, मातृपितृभक्त आणि स्वभावाने सात्विक होता. परंतु सम्राट सहस्त्रार्जुन कार्तवीर्याने पिता जमदग्नीची कामधेनू बळजबरीने पळवली, म्हणून पितृभक्त परशुरामाने अपराधी राजाला आपल्या परशुने ठार केले. हे मुलाचे आततायी कृत्य जमदग्नीना आवडले नाही. म्हणून प्रायश्चित घेण्यासाठी त्यांनी परशुरामाला दीर्घ तपस्येसाठी घरातून हाकलून दिले. तर स्वतः जमदग्नीनी उत्कट तपस्या करून स्वतःचा क्रोध समूळ नष्ट करण्याचे प्रायश्चित्त घेतले.