श्रीरामाने जनकराजाकडील प्रचंड शिवधनुष्याचा भंग करून तेथील साऱयांचीच मने जिंकली. जनकराजाने ठेवलेला ‘पण’ जिंकल्यामुळे जनकराजाने आपली सीता रामाला द्यायचे निश्चित केले. त्याने विश्वामित्रांना सांगितले की, ‘आपण हा पराक्रम राजा दशरथांच्या कानावर घालावा. त्यांना मी रामाला सीता पत्नी म्हणून देणार असल्याचे कळवावे.’ त्यानंतर दूतामार्फत हा निरोप चार दिवसांनी अयोध्येला राजा दशरथापर्यंत पोचला. जनकाने त्याला सहपरिवार लवाजम्यासह विवाहासाठी मिथिलेला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर कुलगुरु वसि÷, कौसल्या, सुमित्रा, कैकयी या तीन राण्या आणि आणि भरत, शत्रुघ्न हे पुत्र आणि प्रचंड सैन्यासह राजा दशरथ मिथिलेला पोचला. जनकाने आनंदाने त्या सर्वांचे यथायोग्य स्वागत केले. पुन्हा दशरथासमोर आपण प्रतिज्ञेप्रमाणे रामाला सीता पत्नी म्हणून देऊ इच्छित आहोत, तरी आपण त्याला संमती द्यावी अशी विनंती केली. दशरथाने ती तत्काळ मान्य केली. दरम्यान जनकाने संकाश्या नगरीचा अधिपती आणि आपला धाकटा भाऊ कुशध्वज, त्याच्या मुली श्रुतकीर्ती आणि मांडवीसह बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही राजांनी आपली वंशपरंपरा एकमेकांना कथन केली. जनकाला मानसकन्या सीतेसह औरस कन्या उर्मिलाही होती म्हणून त्याने रामाला सीता आणि लक्ष्मणाला उर्मिला देण्याचे ठरविले. तसे महषीना तीन वेळा बोलून त्याने वचन दिले. अशा प्रकारे दोघींचे विवाह निश्चित केल्यानंतर त्याने दशरथाला विनंती केली की, आपण रामलक्ष्मणांचा गोदान संस्कार करावा. मघा नक्षत्रानंतर तिसऱया दिवशी म्हणजे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर दोघांचे विवाह संस्कार करावेत. रामलक्ष्मणांच्या अभ्युदयासाठी सुखावह अशी दानेही करावीत.
ते सारे दशरथाने मान्य केल्यावर विश्वामित्रांनी राजा जनकाकडे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले, ‘राजा तुम्हा दोघांची कुळे कीर्तिमान आहेत. तुझ्या धाकटय़ा भावाच्या श्रुतकीर्ती आणि मांडवी या अप्रतिम मुली यांची मी भरत आणि शत्रुघ्नासाठी मागणी करतो.’ जनकाला ही मागणी ऐकून खूप आनंद झाला. त्याला महषी वसि÷ आणि राजा दशरथाचीही संमती मिळाली. जनकानेही भरत शत्रुघ्नांनी कुशध्वजराजाच्या दोन्ही कन्यांचा भार्या म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. राजा दशरथाने जनक आणि कुशध्वजाच्या नम्रतेची प्रशंसा केली. तो नांदीश्राद्ध इत्यादी विवाहपूर्व करायचे संस्कार करण्यासाठी आपल्या परिवारासह आपल्या निवासस्थानी परतला. त्याने दुसऱया दिवशी विवाहपूर्व संस्कार करून प्रत्येक मुलाच्या नावाने एकेक लक्ष गाई कांस्यपात्रासह ब्राह्मणांना दान केल्या. तसेच त्या निमित्ताने उपस्थित ब्राह्मणांना विपुल द्रव्यही अर्पण केले.