बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरात कोरोना प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले की, १५ ऑगस्टनंतर शहरात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना लागू केल्या जातील, ते म्हंटले आहे. बेंगळूर शहरात नेहमीच कोरोना रुग्णांची संख्या जास्त राहिली आहे.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मंत्री अशोक यांनी ही माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी विचारले की याचा अर्थ वीकेंड कर्फ्यू आणि आर्थिक व्यवहार बंद करणे हा पर्याय आहे का?मंत्री अशोक म्हणाले काहीही नाकारता येत नाही आणि बदलत्या परिस्थितीच्या आधारे निर्णय घेतले जातील. शहरातील लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे, ज्यामुळे आम्हाला आशा आहे की प्रकरणे वाढली तरीही शहरातील हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूची संख्या कमी होईल. ”
राज्य सरकारने शेजारील राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कर्नाटकात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी महाराष्ट्र आणि केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक केला आहे.