नवी दिल्ली/प्रतिनिधी
विशेष रेल्वे गाड्या रेल्वे ३१ मार्च २०२१ पासून रद्द करणार असल्याची वृत्तांकन समाजमाध्यमांवर सुरु असून ते पूर्णपणे दिशाभूल करणारे व निराधार आहे, याची नोंद घ्यावी, असे रेल्वे विभागाने म्हंटले आहे.
समाजमाध्यमांवर चुकीच्या बातम्या फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या माहितीसाठी समाज माध्यमांवर फिरणारे वृत्त गेल्यावर्षीचे असून ते आजचे असल्याचे भासवण्यात येत आहे. दरम्यान भारतीय रेल्वेने अश्या प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही.
विशेष सेवा म्हणून सध्या सुरू असलेल्या प्रवासी व उपनगरी रेल्वे गाड्या सुरूच राहतील असे कळवण्यात आले आहे. प्रवाश्यांनी प्रवासात कोविड नियमांचे पालन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.