ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या वर्षी कोरोनाने अख्ख्या जगात हाहाकार माजवल्यानंतर डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. या पार्श्वभूमीवर जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. लसीकरणामुळे कोरोनापासून संरक्षणाचा मार्ग मिळाला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देशात मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यात आले. केंद्रसरकारने देशातील पात्र नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार अंमलबजावणी केली. आता देशात ६० टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
दरम्यान, भारतातील ६० टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही लसींचे डोस देऊन पूर्ण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट करत भारताचे अभिनंदन केले आहे. याशिवाय, भारतातील सुमारे 89 टक्के प्रौढांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. मांडविया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” आपल्याला आणखी नवीन टप्पे पूर्ण करायचे आहेत! भारताचे अभिनंदन. लोकसहभाग आणि आरोग्य कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे, पात्र लोकसंख्येपैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे,” असे मांडविया यांनी केलेल्या ट्वीमध्ये म्हटले आहे.