भाजी विक्रीची उलाढाल कमी,व्यापाऱयांसाठी सुविधा नसल्याने समस्या,
- प्रतिनिधी/ बेळगाव
- कोरोनामुळे एपीएमसीमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहराच्या तीन भागांमध्ये नव्याने भाजी विक्री केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, त्याकडे अजूनही म्हणावा तसा ग्राहकांचा ओढा वाढला नसल्यामुळे भाजी विक्रीची उलाढाल कमी झाल्याचे व्यापारीवर्गातून सांगण्यात आले.
- बी. एस. येडियुराप्पा मार्गावर भाजी विक्री केंद्र मंगळवारपासून सुरू करण्यात आले. बैलहेंगल, गोकाक, कित्तूर, खानापूर परिसरातून या भाजी मार्केटमध्ये शेतकरी येणे गरजेचे आहे. मात्र, सकाळच्या सत्रात म्हणावा तसा प्रतिसाद शेतकऱयांकडून मिळाला नाही. त्याचबरोबर ग्राहकांची संख्याही कमी असल्यामुळे व्यापारीवर्गाला ताटकळत थांबावे लागत होते. भाजीचा लिलाव आणि विक्री मोजक्मयाच ठिकाणी सुरू होती.
- आरटीओ मैदानावरही भाजीची आवक कमी
- आरटीओ मैदानावरही भाजी विक्री केंद्र स्थापन करण्यात आले. या ठिकाणीही भाजीची आवक कमी होती. याचबरोबर ग्राहकांच्या प्रतीक्षेत व्यापारीवर्ग होता. यातच खुले मैदान असल्यामुळे उन्हाचा तडाखा व्यापाऱयांना आणि ग्राहकांना सहन करावा लागत आहे. सध्या या ठिकाणी कोणतेही कँटीन उपलब्ध नसल्याने मोठी समस्या उभी राहिली आहे.
- हिंडाल्को येथे वाहने जाणे कठीण
- हिंडाल्को येथेही खुल्या जागेमध्ये भाजी विक्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी विविध भागातून भाजीची आवक काही प्रमाणात सुरू आहे. मात्र, या विक्री केंद्राला जाण्यासाठी असलेला मार्ग कच्चा असल्यामुळे वाहने जाणे कठीण आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे काही प्रमाणात वाहने जात आहेत. मात्र पाऊस झाला तर त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार असून वाहनांना ये-जा करणे अवघड जाणार आहे. तेव्हा प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
- पाऊस झाल्यास नुकसान होण्याची शक्यता
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱयांसाठी ही दक्षता घेतली आहे. बी. एस. येडियुराप्पा मार्गावर एपीएमसीमधील गाळेधारकांना आणि जयकिसान संघटनेच्या व्यापाऱयांना गाळे उपलब्ध करून दिले आहे. त्या ठिकाणी 55 गाळे आहेत. हिंडाल्को येथे 40, आरटीओ मैदान येथे 43 गाळे सध्या उपलब्ध आहेत. सध्या पत्र्याचे शेड तयार करून हे गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र जोरदार पाऊस झाला तर भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.
- भाजी खरेदी-विक्री केंद्राचा लाभ घ्यावा : दयानंद मुतकेकर
- शहराच्या दक्षिण, पूर्व भागातील शेतकऱयांना आणि किरकोळ व्यापाऱयांना भाजी खरेदी आणि विक्रीसाठी येडियुराप्पा मार्गावर केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेव्हा ग्राहकांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे. शेतकरी भाजी घेऊन येत असले तरी त्याची उचल झाली तरच त्याचा फायदा शेतकऱयांना आणि सर्वसामान्य जनतेला होणार आहे. तेव्हा याची नोंद घेऊन या ठिकाणी खरेदीसाठी आणि विक्रीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
- आवश्यक सुविधा पुरविण्याची गरज : विक्रमसिंह कदम-पाटील
- कोरोनामुळे सध्या तात्पुरते भाजी मार्केट आरटीओ मैदान या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले असले तरी व्यापारीवर्गाला ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्या पुरविणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आवाहनाला साऱयांनी प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
- शेतकऱयांनी सहकार्य करावे : परशराम देसाई
- आरटीओ मैदानामध्ये आम्हाला भाजी खरेदी आणि विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, या ठिकाणी इतर कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी हा व्यवसाय पूर्वीसारखाच करत असून शेतकऱयांनी आणि खरेदीदारांनी आम्हाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.