अधिसूचना पुन्हा प्रसिद्ध : कागदपत्रांची गरज नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने 10 जानेवारीपासून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. तर 1 एप्रिलपासून एनपीआरचे काम सुरू होणार आहे. सर्व राज्यांकरता राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) ची अधिसूचना पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एनपीआरची प्रक्रिया 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणर आहे. एनपीआरमध्ये कुठलाच बायोमेट्रिक तपशील तसेच पुरावा विचारला जाणार नाही. एनपीआरमध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, घराचा क्रमांक असल्यास तो विचारला जाणार आहे. केवळ माहिती विचारली जाणार असून कुठलेच कागदपत्र मागण्यात येणार नाही. जनगणना आणि एनपीआरच्या पहिल्या टप्प्यातील अर्जात संबंधित घराच्या सदस्यांना दिलेली माहिती योग्य असल्याचे सांगावे लागणार आहे.
चालू वर्षात देशभरात जनगणनेसह एनपीआरची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
एनपीआरसाठीचा
तपशील
?व्यक्तीचे नाव
?कुटुंब प्रमुखाशी नाते
?वडिलांचे नाव
?आईचे नाव
?जोडीदाराचे नाव
?लिंग
?जन्मतारीख
?वैवाहिक स्थिती
?जन्मस्थान
?राष्ट्रीयत्व
?वास्तव्य ठिकाण
?सद्यकाळातील पत्ता
?कायमस्वरुपी पत्ता
?व्यवसाय
?शैक्षणिक पात्रता