प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे 24 मार्च पासून न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले होते. ऑनलाईनच्या माध्यमातून महत्वाच्या खटल्यांचे कामकाज सुरु होते. मात्र आता महत्वाच्या खटल्यांबाबत वकीलांनी आता 1 जूनपासून न्यायालयात खटले दाखल करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे 1 जूनपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे.
मंगळवार दि. 26 पासून वकिलांनी न्यायालयामध्ये आपले खटले दाखल केले तरी ते दाखल करुन घेतले जाणार आहेत. मात्र केवळ उच्च न्यायालयातीलच हे खटले राहणार आहे. मात्र आता जिल्हा न्यायालयाचे कामकाज 1 जूनपासूनच सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे प्रलंबित खटल्याची संख्या पुन्हा वाढली आहे. केवळ महत्वाच्या खटल्यांचा निकाल देण्यात आला होता. या कोरोनामुळे अनेक पक्षकारांना न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने पक्षकारांतूनही समाधान व्यक्त होत आहे.