नवीन नळ पाणीपुरवठा योजनेतून गावाला मुबलक पाणीपुरवठा होईल आशी सरपंच रूपाली चौगले यांची ग्वाही
सांगरुळ /वार्ताहर
गावातील नेतेमंडळी सुखाणू कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या साथीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामे व सामाजिक उपक्रम सुरू असून नव्याने होत असलेल्या जलजीवन योजनेतून गावाला स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होईल अशी ग्वाही सरपंच रूपाली मोहन चौगले यांनी दिली.
म्हारुळ (ता. करवीर ) येथे एक कोटी सत्तावन लाख रुपयेच्या नवीन जलजीवन नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपसरपंच सरदार पाटील होते. यावेळी बोलताना सरपंच रूपाली चौगले म्हणाल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात स्वच्छतेबाबतची कामे पूर्ण केली असून पंधराव्या वित्त आयोगातून विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. अपूर्ण कामांना यापुढे प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस ग्रामसेवक पी एस मेंगाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . यानंतर सरपंच रूपाली चौगले यांच्या हस्ते नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके, एकनाथ चौगले, तानाजी पाटील, बाजीराव पाटील, पंढरी पाटील, पंडित कांबळे, नागनाथ मगदूम, वसंत पाटील, बाजीराव चौगले, मोहन चौगले, नामदेव म्हाकवेकर, रंगराव गुरव, रंगराव पाटील, रवींद्र चौगले, हिंदुराव चौगले, दादासो पाटील, कॉन्ट्रॅक्टर सरदार पाटील, सिंग्रापा चौगले, सागर मडके, ग्रामपंचायत सदस्य सागर चौगले, राजाराम कुंभार वंदना म्हाकवेकर, अलका पाटील, शालाबाई गुरव, रेखा कुंभार, प्रकाश कांबळे यांचे सह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते. आभार आनंदराव शिंदे यांनी मानले .