मुंबई
बाजार भांडवलात झालेल्या वाढीचा फायदा शेअर बाजारातील कंपन्यांना होताना दिसतो आहे. मागच्या आठवडय़ात बाजारात तेजीचा सूर होता, ज्यात मुंबई शेअर बाजारात बाजार भांडवल 1 लाख 11 हजार 220 कोटींनी वाढल्याचे दिसून आले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बाजार भांडवलात वाटा अधिक होता. टीसीएसने मागच्या आठवडय़ात 30 हजार 961 कोटींची भर बाजारात घातली होती. आता कंपनीचे बाजार भांडवल 12 लाख 50 हजार 538 कोटी रुपयांवर पोहचले आहे.