नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीने आता आठवडय़ाचे 5 दिवस काम करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार येत्या 10 मेपासून एलआयसी म्हणजे भारतीय जीवन विमा निगमची कार्यालये 5 दिवस चालू राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवारी एलआयसीची कार्यालये सुरू राहणार आहेत. या दिवसातच लोकांना आपल्या पॉलिसीसंबंधीची कामे कार्यालयांना भेटून करून घेता येणार आहेत. 15 एप्रिल 2021 रोजी भारत सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार एलआयसीचे काम येत्या 10 मेपासून आठवडय़ाचे 5 दिवस चालणार आहे.