अनुराग ठाकूर यांच्याकडून अखिलेश लक्ष्य
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. 10 मार्च रोजी अखिलेश यादव ईव्हीएम बेवफा असल्याचे म्हणतील. करहल मतदारसंघातही ईव्हीएम बेवफा झाल्याचे त्यांचे म्हणणे राहणार असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. करहलमध्ये अखिलेश यादव उमेदवार असून त्यांच्याविरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उतरविले आहे.
अखिलेश यादव 7 टप्प्यांनंतर 100 चा आकडाही गाठू शकणार नाहीत. 10 मार्च रोजी (मतमोजणीचा दिवस) ते ईव्हीएम बेवफा असल्याचे म्हणतील. करहल मधून अखिलेश पराभूत होणार आहेत. सपची गुंडगिरी, माफिया राज आणि दहशतवाद्यांशी असलेले संबंध जनता कधीच स्वीकारणार नसल्याचे ठाकूर म्हणाले.