प्रतिनिधी /म्हापसा
सरकारचा नोकऱया मेळावा हा केवळ देखावा असून 10 हजाराच्या नोकऱया म्हणजे आगामी निवडणुकीची भाजपची तयारी आहे. नोकऱयांचे आमिष म्हणजे भाजपची युवा जनतेच्या डोळय़ात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. जनतेने भाजपच्या खोटय़ा आश्वासनाना बळी पडू नये असा आरोप काँग्रेस उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यांनी केला. पंतप्रधानांनी पकोडे काढून स्वावलंबी व्हावे असे म्हटल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोजगार मेळाव्याबाहेर पकोडे काढून मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांना दाखविले. यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना घेरून अडवून ठेवले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या खोटय़ा आश्वासनाचा यावेळी निषेध केला. यावेळी भिके यांच्यासमवेत राज्य अध्यक्ष नौशाद चौधरी, चंदन मांद्रेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री नोकऱया देण्यास अपयशी ठरले- नौशाद चौधरी
एनएसयुआयचे राज्य अध्यक्ष नैशाद चौधरी म्हणाले की, जिल्हा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 10 हजार नोकऱया देतो असे जाहीर केले होते नंतर पालिका निवडणुकीनंतर तेच सांगण्यात आले. आता आगामी विधानसभा निवडणुका आहे आणि आताही तेच संभाषण सुरू आहे. परवा 8 हजार नोकऱया काढल्या व हजारभरांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आजपर्यंत कुणाचीच नियुक्ती झाली नाही. नोकऱया काढल्या म्हणजे नोकऱया मिळाल्या असे नाही. सरकारच्या व मुख्यमंत्र्यांच्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. भाजपला काहीच दूरदृष्टीकोन नाही. सध्या ते भ्रष्टाचारात गुंतल्याच्या आरोपात आहे. मुख्यमंत्री रोजगार देण्यास अपयशी ठरले आहेत. पदवी परीक्षा पास होऊनही आम्हाला नोकऱया नाही म्हणून हे पकोडे आंदोलन आहे अशी माहिती दिली.
युवा वर्गांनी मुख्यमंत्र्यांच्या खोटय़ा आश्वासनाना बळी पडू नये- विजय भिके
उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके म्हणाले की, आज संपूर्ण राज्यावर उपासमारीची वेळ आवी आहे. पंतप्रधानांनी पकोडे तळून स्वयं रोजगार करावा असे सांगितले होते म्हणून आम्ही येथे युवा वर्ग पकोडे तळण्यास सज्ज झालो आहोत अशी माहिती विजय भिके यांनी दिली. भाजपची रोजगाराची संधी म्हणजे युवा वर्गांच्या व जनतेच्या डोळय़ात धूळफेक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.