पणजी प्रतिनिधी
गोव्याचे राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक यांनी 71 व्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिकांना एकतेची भावना आणि राज्याची शांतता आणि जातीय सलोखा टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी घटनेत आत्मसात केलेले आदर्श साध्य करण्यासाठी लोकांना एकत्रित प्रयत्न, सहकार्य, समर्पण आणि गतिशीलता देण्यास प्रयत्न करण्याचे सांगितले. कांपाल पणजीतील परेड मैदानावर आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगा फडकविल्यानंतर राज्यपाल लोकांसमोर बोलत होते.
पुढे बोलताना राज्यपालांनी गोवा हे देशातील जलदगतीने विकास साधणारे राज्य असल्याचे सांगितले. सामाजिक, शारीरिक, औध्य?गिक, पर्यटन, क्रीडा सुविधा आणि आभासी कनेक्टीविटी अशा क्षेत्रात गोवा विकसीत झाल्याचे ते म्हणाले. गोव्यात महत्वपूर्ण बंदर पायाभूत सुविधा आहेत आणि गोव्याला लवकरच स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायास चालना मिळेल व सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत होईल असे ते म्हणाले.
राज्याने औषध उध्य?गाचा पाया स्थापित केला असल्याचे नमुद करून जैव तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा ज्ञानाधि÷ाrत उध्य?गांसाठी उद्योन्मुख स्थळ म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले.
सक्षम विकासाची उद्दी÷s पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य चांगल्याप्रकारे प्रगती करीत आहे. निती आयोगाने प्रसिध्द केलेल्या एसडीजी इंडिया इंडेक्स 2019-2020 मध्ये राज्य 7 व्या क्रमांकावर आहे ही गोव्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले. गोवा भूकमुक्त आहे तरीसुध्दा इनोव्हेशन, हवामान बदल आणि जलसंपत्तीसंबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठी आणखीन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना श्री. मलिक यांनी कृषी क्षेत्राचा सक्षम विकास करण्याची गरज व्यक्त केली. कृषी उत्पादनाचा व्यापार वाढविण्यासाठी आंबा, काजू यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्य सरकारने आता सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रीत केलेले आहे आणि सुमारे 10 हजार हेक्टर जमीन सेंद्रिय शेती लागवडीखाली आणण्याची योजना असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राज्यपालांनी विविध क्षेत्रात उत्कृ÷ता गाठलेल्यांना पुरस्कार प्रदान केले. पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत गांवस यांना 2017-18 मध्ये पोलीस प्रशिक्षणात उत्कृ÷ कामगिरी केल्याबगद्दल केंद्रिय गृहमंत्री पदक बहाल करण्यात आले,
सहाय्यक विभागिय अधिकारी श्री. आजित कामत यांना उत्कृ÷ सेवेबद्दल राष्ट्रपती अग्नीसेवा पदक मिळाले. उत्कृ÷ सेवेबद्दल राष्ट्रपती अग्नीसेवा पदक स्टेशन फायर अधिकारी श्री मार्वीन बॉस्को फेर्रा?व यांना प्राप्त झाले. लिडिंग फायर फायटर श्री रोहिदास परब आणि लिडिंग फायर फायटर श्री. प्रकाश कन्नाईक यानाही राष्ट्रपती अग्नीसेवा पदक मिळाली आहेत.
सुरवातीस राज्यपाल श्री. मलिक यांनी मानवंदना स्वीकारली आणि भारतीय लष्कर, नौदल, भारतीय तटरक्षक, कर्नाटक पोलीस, गोवा पोलीस, गृहरक्षक, एनसीसी छात्र आणि विविध शाळांतील विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाची पाहणी केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते श्री. दिगंबर कामत, आमदार श्री. फ्रा?सिस सिल्वेरा, पणजीचे महापौर श्री. उदय मडकईकर, ?ड जनरल श्री. देवीदास पांगम, मुख्यसचिव श्री परिमल राय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका, सरकारचे सचिव, वरि÷ सुरक्षा अधिकारी आणि खात्यांतील प्रमुख उपस्थित होते.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच राज्यातील विविध शाळांतील नृत्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. मल्ल खांब हे आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.