ऑनलाईन टीम / तरुण भारत :
येत्या दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकर भरती करण्यात यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. हे काम ऍक्शन मोडमध्ये करण्यात येणार असून, देशातील लाखो बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे.
पीएमओ कार्यालयाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमधील मानव संसाधनांचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडवर काम करून 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश त्यांनी सरकारला दिले आहेत,”
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लाखो बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विविध सरकारी विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला प्रथम प्राधान्य देण्यास सांगितलं होतं.